धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील जागजी येथील एनव्हीपी शुगर प्रा.लि. या कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामात तिसऱ्या पंधरवाड्यामध्ये 16 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर पर्यंत गाळपास आलेल्या ऊसाचे 2500 रूपयेप्रमाणे ऊसबिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1 डिसेंबर रोजी जमा करण्यात आले असल्याची माहिती चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी दिली आहे.

एनव्हीपी शुगरने चाचणी गळीत हंगामाच्यावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे गाळपासाठी आलेल्या ऊसाचे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा दिवसांत जमा करण्यात येत आहे. ही परंपरा द्वितीय गळीत हंगामात देखील कारखान्याने जोपासली आहे. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून पंधरवाडा संपल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बील जमा करण्यात आले असून यापुढेही शेतकऱ्यांचे ऊस बिल प्रत्येक पंधरवाडा संपल्यावर जमा करण्याची परंपरा कायम ठेवणार असल्याचे सांगून तिसऱ्या पंधरवाड्यात गाळपासाठी आलेल्या ऊसाचे रूपये 2500 प्रमाणे बिल संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलेले असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या शेतकऱ्यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे खाते दिले आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपले आपले बिल घ्यावे. त्याचबरोबर ज्यांनी अद्याप खाते दिलेले नाही अशा शेतकऱ्यांनी पवनराजे लोकसमृद्धी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.धाराशिव बँकेत जाऊन आपले बिल घ्यावे. असेही चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी कळविले आहे.

 
Top