मुरुम (प्रतिनिधी)- भारताच्या स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे एकत्रीकरण करण्यात मोलाची भूमिका बजावणारे, भारतीय संघाची एकता टिकवून ठेवणारे भारताचे पाहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान 

“भारताचे एकीकरणकर्ता“ असे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त   पोलिस  ठाणे उमरगा,  श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा, एन सी सी,  पोलिस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एकता दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाची अखंडता टिकवण्यासाठी एकता दौड मधून संदेश देताना सरदार वल्लभाई पटेल यांचे कार्य सर्वांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी आहे असे आवाहन पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार यांनी केले. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय येथून या  एकता दौडचा  शुभारंभ पोलिस उपअधीक्षक सदाशिव शेलार , पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, प्राचार्य डॉ संजय अस्वले, यांच्या हस्ते संपन्न झाले. 

यावेळी सहायक  पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे, पोलिस उपनिरीक्षक रामहरी चाटे,  गंगाधर पुजरवाड, पाडुरंग कन्हेरे, डॉ उदय मोरे, प्रशांत पाटील,  बंडू पाटील  यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, प्राचार्य डॉ संजय अस्वले  यांनी मनोगत आणि शुभेच्छा दिल्या. या एकता दौडचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला.  या उपक्रमासाठी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राध्यापक,  पोलीस ठाणे उमरगा येथील सर्व पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटनेचे प्रतिनिधी, दिशा अकॅडमी,  करिअर कट्टा आणि एनसीसी चे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top