धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारातील एनव्हीपी शुगरच्या वतीने 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या शेतकऱ्यांचे ऊसबिल 4 कोटी 3 लाख 75 हजार 458 रूपये संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती चेअरमन बालाजी पाटील यांनी दिली आहे.

एनव्हीपी शुगरने चाचणी गळीत हंगामापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अवघ्या पंधरा दिवसांत ऊसाचे बिल अदा करण्याची परंपरा सुरू केली आहे. यंदाच्या गळीत हंगामात देखील अवघ्या पंधरा दिवसात ऊसबिल प्रतिटन 2500 रूपयाप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. यंदाच्या गळीत हंगामात ऑक्टोंबर महिन्यापासून ऊसबिल पंधरा दिवसांत जमा करण्यात आलेले आहे. आता 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी आणि उस्मानाबाद जनता सहकारी बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले असल्याचे एनव्हीपी शुगरचे चेअरमन बालाजी पाटील यांनी सांगितले.


 
Top