धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरातील मतदाराना त्यांच्या प्रभागात मतदान करण्यासाठी आता मोठी अडचण होणार आहे. कारण एका प्रभागातले मोठ्या प्रमाणावरील नावे दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. 2022 च्या प्रभाग रचना प्रमाणे मतदारही ठेवणे अपेक्षित होते. मात्र प्रभाग रचना तीच असताना मतदार याद्यामध्ये मोठा घोळ झाला असा आक्षेप महाविकास आघाडीने घेतला आहे. तर निवडणुकीच्या अगोदरच विरोधकांच्या पायाखाली वाळू घसरली आहे, असा टोला भाजपाच्यावतीने लगावण्यात आला आहे. 

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अय्याज शेख, शिवसेना ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ गुरव आदि उपस्थित होते.  यावेळी आघाडीच्यावतीने सांगण्यात आले की, 31 जुलै 2022 ला मतदार यादी आक्षेपसह प्रसिद्ध झाली होती. प्रभाग रचना निश्चित करताना तीच प्रभाग रचना गृहीत धरलेली आहे. मग मतदार याद्यासुद्धा त्याच रचनेनुसार निश्चित करणे आवश्यक होते. पण प्रशासनाने याद्या करताना मोठा घोळ घातला आहे. 


महाविकास आघाडीच्या काळातीलच प्रभाग रचना

भाजपाच्यावतीने अमित शिंदे, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी महाविकास आघाडीने केलेल्या आरोपांचे खंडण केले. महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळातही प्रभाग रचना झाली असून, न. प. निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणे नौटंकी चालू आहे. चुकीचे आरोप भाजपवर करत आहेत असेही त्यांनी सांगितले. 


 
Top