धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी गांधी विद्यालय, चिखली येथे पार पडल्या. या स्पर्धेत एकलव्य आश्रम शाळा मंगरूळ यमगरवाडी, तालुका तुळजापूर येथील विद्यार्थ्यांनी 14 वर्ष वयोगट मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
या विजयी संघामध्ये अनोज चव्हाण, वैभव धोत्रे, सुदर्शन राठोड, आकाश दूधभाते, रुद्राक्ष राठोड, साहिल चव्हाण, अमर पंचमहाल, दिनेश वीर, तेजस गजभार, विशाल बंडीधनगर या सर्व खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून संघाला विजेतेपद मिळवून दिले.
या विजयानंतर या संघाची विभागीय स्पर्धेसाठी लातूर येथे निवड झाली आहे. संघाचे मार्गदर्शक व क्रीडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर भुतेकर, बालाजी क्षीरसागर, तसेच कबड्डी प्रशिक्षक यशवंत निंबाळकर यांचेही विशेष योगदान राहिले. संस्थेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्यवाह विवेक अयाचीत, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे, तसेच संस्थेचे संचालक मंडळ, क्रीडा समितीचे सर्व सदस्य व सर्व कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूंना अभिनंदन करून पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.