धाराशिव (प्रतिनिधी)- ऑगस्ट सप्टेंबर महिण्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्हयातील भुम, परांडा, वाशी सह धाराशिव कळंब, उमरगा, तुळजापुर, लोहारा तालुक्यात मोठया प्रमाणात नुकसान झाले असून येथील बाधीत पुरग्रस्तांना माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मीठ, धान्य, व इतर आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे कीट वितरण करण्यात आले.

खासदार अरविंद सावंत यांनी बेलगाव (पिं) ता. भुम येथे पुरग्रस्तांची भेट देवून त्यांना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील,जिल्हाप्रमुख रणजीत पाटील,उपजिल्हा प्रमुख चेतन बोराडे, दिलीप शाळू महाराज, विहंग कदम, जिनत सय्यद,भगवान बांगर,प्रल्हाद अडगळे,दिपक मुळे,विनायक नाईकवाडी,कोहिनूर सय्यद तसेच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. हा उपक्रम महानगर टेलिफोन निगम कामगार संघ, स्थानिक लोकाधिकार समिती, आणि जाणीव ट्रस्ट यांच्या सहकार्याने यशस्वी झाला. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला.

 
Top