भूम (प्रतिनिधी)- सात्विक आहार घ्या चांगले विचार मनात बाळगा कुणाचा हेवा देवा करु नका परमेश्वराची सेवा मनापासून करा तुम्हाला आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. असे ह भ प शिवलिला पाटील युवती किर्तनकार बार्शी यांनी सांगीतले. 

दि 26 रोजी शुक्रवारी समर्थ नगर नवरात्र महोत्सवा निमित्त समर्थ नगर येथे किर्तन पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अनेकजन व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्यसनामुळे पिढी बरबाद होत आहे. परमेश्वर प्राप्तीसाठी भव्तीचा मार्ग स्विकारा तरच आपले जिवण सार्थकी लागेल कुटूंबात आई वडील भाउ बहिण सुन सासु यांच्याशी चांगला वागा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आवश्यक असेल तरच मोबाईलचा वापर करा. मोबाईल पेक्षा घरातील कुटूंबाचा संवाद वाढवा. तरच आपले जिवन सार्थकी होईल. यावेळी माजी नगराध्यक्षा संयोगीता गाढवे यांच्या हस्ते हभप शिवलिला पाटील यांचा सत्कार करण्यात आला. किर्तनासाठी पखवाज साथ बाबासाहेब पांचाळ गुरुजी व राळेसांगवी येथील वाघ चांगली साथ यांनी केली. यावेळी भूम व सावरगाव येथील टाळकरी यांनी साथ दिल्याने किर्तन रंगतदार झाले. या किर्तनासाठी समर्थ नगर नवरात्र महोत्सव समिती पदाधिकारी यांनी विषेश परिश्रम घेतले. किर्तनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थिती होते.

 
Top