तुळजापूर  (प्रतिनिधी)-शहरातील बहू प्रतीक्षित भवानी रोड ते आर्य चौक ते किसान चौकी रस्ता रुंदीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे तसेच या संदर्भात नकाशासह अंतिम मंजुरी मिळाली आहे,

 वरील विषयी यापूर्वी 2011 ला निघालेल्या अधिसूचनेनुसार रस्ता रुंदीकरण हे एका बाजूस जास्त आणि एका बाजूस कमी असे होते परंतु याला स्थानिकांचा विरोध होता व जनभावना लक्षात घेऊन तत्कालीन नगरपरिषद ने दोन्ही समसमान रुंदीकरण व्हावे या उद्देशाने सर्वसाधारण सभेत ठराव घेतला.

 सन 2019 मध्ये शासनामार्फत संपूर्ण रस्त्याच्या नावात शासनाकडून तफावत दिसून आली व हे नाव आर्य चौक ते किसान चौकी अशी मंजुरी नजरचुकीने झालेले लक्षात आले, या चुकीच्या दुरुस्तीसाठी पुन्हा शासनाकडे 2023 साली प्रस्ताव देण्यात आला, त्यामध्ये भवानी रोड आर्य चौक ते किसान चौकी असा नवीन प्रस्ताव देण्यात आला याच दरम्यान भूसंपादनासाठीची पाच टक्के अधिसूचना निघाली ज्यात बाधित नागरिकांना याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे हे लक्षात आले असता नंतर माननीय आमदार राणा दादा यांच्या माध्यमातून व विनोद गंगणे,माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या प्रयत्नातून 5% अट रद्दीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला, आणि दिनांक 4 /10 /2024 रोजी ही जाचक अट रद्द करण्यात आली,तदनंतर 2 व 3/ 6/2025 रोजी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी स्वतः मुंबई येथे दोन दिवस उपस्थित राहून अव्वल सचिव महाराष्ट्र शासन नगर विकास मंत्रालय येथून सदर रस्त्याचे दोन्ही बाजूने समसमान भूसंपादन करणे करिता दाखल केलेल्या भाग नकाशास मंजुरी घेतली या प्रकारे मा.आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून भवानी रोड, आर्य चौक ते किसान चौक रस्त्याचा भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 
Top