तुळजापूर (प्रतिनिधी)- सध्या तुळजापूर शहर विकास आराखडा संदर्भात अनेक उलट सुलट घटना घडत आहेत. त्यातीलच एक म्हणजे श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांना तलवार देत असतानाच शिल्प हे आष्टभुजा नसावे तर ते द्विभुजा आसावे. मुळात तुळजाभवानी देवीची मुळ मुर्ती ही आष्टभुजा मुर्ती आहे. आणि देवीचे आष्टभुजा रुप सर्वापर्यंत पोहचले पाहिजे हे ही तितकेच खरे आणि त्या शिल्पा द्वारे आई तुळजाभवानीचे आष्टभुजा रुप आणि आई तुळजाभवानी व शिवरायांचा इतिहास एकाच शिल्पातून समजला तर त्यात भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही. दूसरा भाग राहिला तो म्हणजे द्विभुजा रुपातली मुर्ती तर ते रुप एका चित्रकाराने त्याच्या कल्पनेतील चित्र रेखाटलेले चित्र आहे. परंतू शिल्प आष्टभुजा असो किंवा द्विभुजा असो त्यामुळे कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही. या शिल्पाकडे फक्त आई तुळजाभवानी व छत्रपती शिवरायांचा इतिहास महाराष्ट्रासह देश विदेशातून येणाऱ्या भक्तांसाठी प्रेरणा देणारे ठरावे. दूसरा वादाचा विषय म्हणजे देवीला भारतमाता संबोधित केल्यामुळे आई तुळजाभवानी ही जगतजननी, विश्वस्वामिनी, आदिशक्ती, शिवशक्ती आशा अनेक नावाने ओळखली जाते. मग त्या जगदंबेला भारत देशात राहणाऱ्या देशवासीयांची माता म्हणजेच भारत माता म्हणले तर त्यात वावगे काय आहे हा मोठा प्रश्न येतो. असो परंतू जसा हा विकास आराखडा सादर झाला तेंव्हा पासूनच या ना त्या कारणाने विरोधाच्या छायेत आहे.

राणाजगजितसिंह पाटील तालुक्याचे आमदार तथा विश्वस्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान. यांनी हा विकास आराखडा स्थापने पासून ते मंजूरी पर्यंत विषेश कष्ट घेतले ते नाकारुन चालणार नाही. त्यांनी या विकास आराखड्यात पारदर्शकता यावी व कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी प्रामाणिक पणे सर्व तुळजापूर शहरातील जनतेस व भाविकांसमोर हा आराखडा कशा पद्धतीने होणार आहे हे स्क्रीन द्वारे सर्वांना माहिती दिली. या संदर्भात सर्वांच्या हरकती मागविण्यात आल्या. त्या हरकतींचा विचार लक्षात घेऊन पार्किंग मधील दर्शन मंडप प्रशासन कार्यालया पाठीमागे घेतला. आता येऊत आपण तुळजापूर वासियांच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या गैरसमजाबाबत या विकास आराखड्यात 108 फुटी मुर्ती, 51 शक्ती पिठ, सुंदर बगीचा, रामदरा तलावात बोटींग, व शिवसृष्टी हे सर्व मंदिरांच्या पाठीमागे म्हणजेच सोलापूर धुळे बायपास महामार्गाच्या बाजूला यात दोन भिन्न मतप्रवाह आहेत. एक म्हणजे प्रशासकीय यंत्रणेचा हा सर्व आराखडा तयार करणारे इंजिनिअर्स व त्यातील तज्ञांच्या मते रामदरा तलाव व त्या बाजुच्या वेढलेल्या डोंगर दऱ्यांमुळे हे लोकेशन परफेक्ट लोकेशन आहे .आणि दूसरा मतप्रवाह म्हणजे स्थानिक पातळीवरील पुजारी, व्यापारी व ईतर जणांच्या मतानुसार जर का सर्व पर्यटन स्पॉट खालच्या बाजूला राहिले तर भाविक खालच्या खाली येऊन खालच्या खालून जाईल. शहरात भाविक येणार नाही. त्यामुळे स्थानिक पुजारी व व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा मंदिरा पाठीमागील सोलापूर धुळे महामार्गाच्या बाजूला सर्वच पर्यटन स्पॉट करण्यास विरोध होत आहे. आता या मध्ये पालकमंत्री महोदयांनी विषेश लक्ष घातल्याने या विकास आराखड्या संदर्भात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. हे सर्व पाहता विकास आराखड्यात राजकीय कुरघोडी होऊ नये म्हणजे झाले. पालकमंत्री हे जिल्ह्याचे प्रमुख असल्याने त्यांच्या सुचनेनुसारच प्रशासकीय अधिकाऱ्यांना चालावे लागनार हे जरी खरे असले तरी हा विकास आराखडा मंजूर करुण आणणारे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा देखील प्रशासनावर चांगलाच दबदबा आहे. 

या दोन मातब्बरामध्ये प्रशासकीय अधिकारी वर्गाची मात्र त्रेधातिरपीट उडणार हे नक्की. हे सर्वांमधील गैरसमज दूर होण्यासाठी पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी सह सर्व प्रशासकीय अधिकारी तिन्ही पुजारी  मंडळाचे प्रमुख व तुळजापूर शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी व सामाजिक संस्था या सर्वांची एक व्यापक बैठक आयोजित करुन या बैठकीत सर्व बाबी क्लीअर करुन विकास आराखड्यातील सर्व अडथळे दूर व्हायला हवेत. पालकमंत्री प्रताप सरनाईक व आमदार राणाजगजितसिंह पाटील हे दोघेजण या विकास आराखडा रथाची दोन चाके आहेत. तरी या दोन चाकांनी एक विचाराने व एका रेषेत चालले तरच हा विकास आराखड्याचा रथ शहर व कोट्यवधी भाविकांच्या सेवेसाठीच्या विकासा पर्यंत पोहचणार आहे . या द्वारे आम्ही एक पुजारी व शहरवासीय म्हणून एकच आशा आहे की तुळजापूर शहर विकास आराखडा ठरु नये राजकीय आखाडा. असे मत देविचे पुजारी भाजप नेते इंद्रजित साळुंके व बाळासाहेब भोसले यांनी व्यक्त केले.

 
Top