धाराशिव (प्रतिनिधी)-  ड्रग्जप्रकरणी निपक्ष चौकशी व्हावी यासाठी खासदार व आमदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते मुख्यमंत्री यांना भेटणार म्हणल्यावर भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना नेमक्या कसल्या मिरच्या झोंबल्या असा सवाल शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी विचारला. भाजप पेक्षा अध्यक्षाना आता एक कुटुंब महत्वाचे वाटू लागले की काय अशी शंका गुरव यांनी उपस्थित केली. धाराशिव ड्रग्ज प्रकरणातील आरोपींची हकालपट्टी भाजपाचे जिल्हाध्यक्ष करतील का? असा प्रश्न गुरव यांनी उपस्थित केला आहे. 

गुरव म्हणाले, ड्रग्ज प्रकरणात कोण गूंतलेत ? ते कोणाशी संबधित आहेत? या प्रश्नाचे उत्तर जिल्हाध्यक्ष देणार का? कालच्या पत्रकार परिषदेत पक्षीय टीका केलेली नाही. ड्रग्ज सारखा सामाजिक विषय घेऊन त्याचा तपास योग्य व्हावा या अपेक्षा लोकप्रतिनिधी म्हणून खासदार व आमदार यांनी मांडल्या. त्यात विकासाचे गोंडस नाव पुढे करून विषयांतर जिल्हाध्यक्ष कोणासाठी करत आहेत. एकाच कुटुंबावर बोलणे यावर तुम्हाला राग येण्याचे कारण काय? या कुटुंबाच्या कर्तबगारीमुळेच जिल्हा आकांक्षित यादीत गेला. आता जो विकास तुम्ही सांगत आहात तो पाहण्यासाठी त्या कुटुंबाच्या नजरेतून तो दिसेल. जिल्हाध्यक्ष हे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी असतात कोणाची तरी वकिली करून चुकीच्या प्रकरणाच समर्थन करण्यासाठी नसतात. अशी दुसऱ्याची वकिली भाजपला शोभते का? पार्टी विथ डिफरन्स म्हणणारे, साधनसूचितेच्या गप्पा मारणाऱ्याना आरोपीची बाजू घेणं शोभतं का? आपल्यात एवढंच पक्षप्रेम असेल तर ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे तुम्हाला अधिकार आहेत का? असेल तर तसे धाडस दाखवाल का? असा सवाल शेवटी गुरव यांनी भाजप जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांना केला आहे.

 
Top