भूम (प्रतिनिधी)- डि.पी.डी. सी. योजने अंतर्गत मिळणारा निधी वितरीत न सरपंच परिषदेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले.
धाराशिव जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आसून राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांना डि.पी.डी.सी. योजने अंतर्गत येणारा निधी वितरीत केलेला आहे. परंतु धाराशिव जिल्हयामधील निधी अदयापपर्यंत वितरीत करण्यात आलेला नाही. धाराशिव जिल्हा हा या योजने पासून वंचित आहे. धाराशिव जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. माननीय मुख्यमंत्री महोदय व पालकमंत्री महोदयांनी हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा. मार्गी न लागल्यास सरपंच परीषद जिल्हाभर आंदोलन करेल व त्यानंतर मंत्रालया समोर उपोषण करण्यास मागेपुढे पाहणार नाही.सरपंच परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे .यावेळी कोहिनूर सय्यद ,युवराज गटकळ ,अतुल शेळके ,मयूर गटकळ ,श्रीराम खंडागळे ,संजय पाटील, तानाजी पाटील ,सतीश मातने ,अमर माने , ॲड .रामराजे साळुंखे ,कृष्णा लोद , बिरमल माळी ,गणेश खैरे ,प्रशांत जाधव ,गजानन चव्हाण ,जिनत सय्यद ,आय्युब पुरी ,संजय गुंजोटे,सुजित हरंगेकर यावेळी उपस्थित होते.