तुळजापूर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवार दि.15 जून सकाळी 11 वाजता तुळजापूर येथे जुन्या बसस्थानकासमोरील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, राजेंद्र हाके, दुर्वास भोजने या स्वाभीमानी शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांनी केले आहे.