भूम (प्रतिनिधी)- भूम येथील पंचायत समितीमध्ये तालुक्यातील जयवंतनगर येथील सरपंचाचे पती व रोजगार हमी योजनेचे पालक तांत्रीक अधिकारी (कंत्राटी) यांच्यामध्ये गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये रोजगार हमी योजनेचे एमबी का भरले नाहीत. या कारणावरून फ्रीस्टाईल (ता. 2 जून) रोजी  हाणामारी झाली आहे.

अधिक माहिती अशी भूम तालुक्यातील जयवंत नगर येथे रोजगार हमी योजनेतून सिमेंट रस्त्याचे कामे झाले आहेत. मात्र मागील दोन वर्षापासून रोजगार हमी योजनेतून झालेल्या रस्त्याच्या कामाचे एम बी संबंधित पालक तांत्रीक अधिकारी (कंत्राटी) यांनी भरली नसल्याची तक्रार गट विकास अधिकारी यांच्याकडे जयवंत नगर च्या सरपंचाचे पती सांगत असताना पालक तांत्रिक अधिकारी या दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. त्यानंतर पंचायत समितीमध्ये गोंधळ निर्माण झाला. भूम पंचायत समितीला मागील अडीच वर्षात 14 गटविकास अधिकारी लाभल्यामुळे मागील दोन वर्षापासून पंचायत समितीमधील कामे रेंगाळत पडत आहेत. त्यामुळे तालुक्यातील सरपंचांना पंचायत समितीमध्ये ग्रामीण भागातील कामे करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा घटनांमुळे भूम तालुक्यातील कोणत्याही कार्यालयाच्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीची वचक राहिलेले नाही.

पुढील काळात कायमस्वरूपी गट विकास अधिकारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे पंचायत समिती विभागातील कामे पेंडिंग राहणार नाहीत व कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही. यासाठी कायमस्वरूपी गट विकास अधिकारी देण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकातून होत आहे.


आज पंचायत समितीमध्ये तालुक्यातील जयवंत नगर येथील रोजगार हमी योजनेच्या कामावरून जो वाद झाला. त्या कामासंबंधी चौकशी करणार आहे.

व्ही.टी. वजे

प्रभारी गटविकास अधिकारी

 
Top