तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील घाटशिळ घाटामध्ये सर्व घाण पाणी, खडी रस्त्यावर पडलेली होती. पाणी रस्त्यावर येत होते. अनेक गाड्या स्लिप होऊन एक्सीडेंटचे प्रमाण वाढत होते. याची सुचना उपविभागीय अभियंता सा. बां यांना देताच, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचाऱ्यांनी घाटातील रस्त्यावर आलेली खडी वाळु काढुन सांडपाण्यासाठी जेसीबी ने खोली करुन दिल्याने प्रवाशी, भाविक, शेतकरी, वाहनचालक यांची होणारी गैरसोय दूर होवुन अपघात घटना टळल्या. कामानंतर सदरील घाटात जावुन शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अमोल जाधव व शहर प्रमुख दत्तोबा भोसले, उपशहर प्रमुख रमेश चिवचिवे, शेतकरी सेना प्रमुख गणेश नेपते व सर्व शिवसैनिकांनी पाहणी केली.