तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील पथदिवे दिवसाही चालुच  असुन हे कमी काय म्हणून नगरपरीषद कार्यालयात सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या  बांधकामा विभागात कार्यालयीन काम चालु असताना कार्यालयात ऐकही अधिकारी कर्मचारी नसताना लाईट पंखा चालुच असल्याने हा विजेचा विनाकारण होणारा अपव्यय रोखणार कोन असा सवाल शहरवाशियांन मधुन केला जात आहे

पथदिवे पाणीपुरवठा थकबाकी  कोट्यावधी रुपये असुन या पोटी महावितरण ने शहराचा अनेक वेळा पाणीपुरवठा व पथदिवे कनेक्शन तोडले होते याचा फटका भाविकांन सह शहरवासियांना बसत होता यातुन ही नगरपरीषद ला अजुनही शहाणपणा आला नसल्याचे दिसुन येते सोमवारी नगरपरीषद बांधकाम विभागात एकही अधिकारी  कर्मचारी नसताना लाईट पंखे चालुच होते.

मागील काही दिवसापासुन शहरातील  विविध भागातील पथदिवे   रात्रंदिवस चालु आहेत येथील नगरपरीषद  दोन नंबर शाळा घाटशील रोड परिसरातील स्टेट लाईट दिवसाही  चालू आहे महावितरण कंपनीमध्ये मध्ये लेखी तक्रार नगरपालिकेने दिली नसल्यामुळे  जो काही फॉल्ट आहे तो काढण्यात आलेला नाही  माञ  याचा भुर्दंड शहर वासियांना भरावा लागत आहे.  जे नागरिक  विविध कर भरतातत्यांचा पैशाचा हा अपव्यय आहे येथे होणारा अनावश्यक खर्च  आणखी  करवाढी करुन नगरपरीषद नागरिकांवर अर्थिक भार पडत आहेत याला जबाबदार कोण? नगरपालिका विद्युत विभाग बांधकाम विभाग  झोपा काढत आहेत का असा सवाल नागरीकांनी केला असुन  मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी  याकडे  गांभीर्य पूरक लक्ष घालून नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान टाळावे  अशी मागणी शहरवासियांनमधुन केली जात आहे.

 
Top