तुळजापूर (प्रतिनिधी)- वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी आलेले भाविक अथर्व चंद्रशेखर बेले यांची 15 तोळ्यांची चांदीची छत्री आज सकाळी कल्लोळ तीर्थात अंघोळ करताना पाण्यात पडली होती.

ही घटना घडल्यावर कर्तव्यावर असलेले स्वच्छता कर्मचारी सुरज क्षीरसागर यांनी तत्परता दाखवत पाण्यात उतरून ती छत्री शोधून काढली. दर्शनासाठी गेलेले भाविक अथर्व बेले यांना बोलावून घेण्यात आले आणि ओळख पटवून त्यांच्या हाती ती चांदीची छत्री परत देण्यात आली. यावेळी स्वच्छता पर्यवेक्षक राम धाकपडे उपस्थित होते. स्वच्छता कर्मचारी सूरज क्षीरसागर यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या या आदर्श कृतीमुळे तुळजाभवानी मंदिरातील सेवा व्यवस्था व लोकांच्या विश्वासाला बळ मिळाले आहे.


 
Top