भूम (प्रतिनिधी)- भूम मधील बाणगंगा हायस्कूलच्या इ.10 वीच्या (1998 साल) विद्यार्थ्यांचा 27 वर्षांनंतर अतूट स्नेहबंध गेट-टुगेदर उत्साहात संपन्न झाला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत, जुन्या मित्र-मैत्रिणीची भेट घेत आणि शालेय दिवस पुन्हा अनुभवताना सर्वचजण भारावून गेले होते.

कार्यक्रमाचे आयोजन संत गजानन महाराज मंदिर च्या सभागृहात करण्यात आले होते. सुरुवातीला राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रमाता जिजाऊ व  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक बी. डी नाईकवाडी, वसंत भोईटे, अलीम शेख सर, सुरेश पाटुळे, पंडित सर, व शिपाई बशीर शेख व झुंबर गायकवाड उपस्थित होते. त्यानंतर सर्वांनी आपली शालेय आठवण सांगत एकमेकांशी अनुभव शेअर केले. सर्व उपस्थित गुरुजनाचे माजी विद्यार्थ्याच्यवतीने सत्कार करण्यात आला.जुने फोटो स्लाईड्स, शिक्षकांची आठवण, विनोद आणि एकमेकांवरील किस्से यामुळे वातावरण भारून गेले.

या गेट टुगेदर साठी परगावाहून  माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी आले होते. ज्यात शिक्षक, उद्योजक आणि शासकीय सेवेत कार्यरत असल्याचे पाहून सर्वांना अभिमान वाटला. शिक्षकांनी दिलेल्या शिकवणीमुळे आपण इथपर्यंत पोहोचल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.यावेळी संतोष चोरमले, अशोक गाढवे, अब्दुल शेख, रिहान मोगल, दादा साळूंखे, सुनील चौधरी, विठ्ठल अडागळे, विलास यादव, हबीब शेख, दत्ता चोरमले,ज्ञानदेव पवार, फैजान काझी, यांच्या सह उर्मिला कुटे, अर्चना तेलंग, सुनंदा कुटे, रिता सानप, अर्चना मृदंगे, त्रिशाला गाढवे, सुभद्रा गाढवे, मीना साठे, मनीषा माळी आदी उपस्थित

 होते.हा गेट टुगेदर हे केवळ मैत्रीचं नव्हे तर जुन्या आठवणींचं, आपुलकीचं आणि शाळेच्या आणि शिक्षकांच्या ऋणानुबंधांचं सुंदर साजरीकरण होत.

 
Top