भूम (प्रतिनिधी)- आमचे सरकार आले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी करु, लाडक्या बहिणींना 2100 रूपये देवू, सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना 15 हजार रू देवू, शेतीला 24 तास वीज देवू, 45 हजार गावात पाणंद रस्ते करू, हर घर जल, हर घर छत चे काय झाले असे अनेक प्रश्न घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी गावागावात जाऊन शेतकऱ्यांना जनजागरण करत आहेत. या लबाड फडणवीस, शिंदे, पवार सरकारला क्या हुआ तेरा वादा विचारण्यासाठी बुधवार दिनांक 11 जून रोजी तहसील समोर शेतकऱ्यांचे जन आंदोलन होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांनी केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रत्येक गावभेट दौरा व शेतकरी जनजागरण मोहीम चालू आहे. हा गावभेट दौरा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, व खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाप्रमुख रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
यावेळी भूम तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, समन्वय दिलीप शाळू महाराज, महिला संघटक उमाताई रणदिवे, माऊली शाळू, सतीश वारे, दत्तात्रय जगदाळे, बाळासाहेब औताडे, लेकूरवाळे, ॲड काळे, सुभाष पाटूळे, वालवड गणाचे उपतालुकाप्रमुख आब्दूल भाई सय्यद, विभाग प्रमुख रफीक तांबोळी, गणप्रमुख अजय कोकाटे, उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, उपतालुका प्रमुख अविनाश गटकळ, गजेंद्र खुणे,जावेद तांबोळी, देवळाली गटामध्ये शहाजी जगदाळे, अजीत तांबे, सुनिल गपाट, बापूसाहेब कावळे माणकेश्वर गटात विभाग प्रमुख लहू गोरे,दोपारे मामा, पिराजी शेळके, उपतालुकाप्रमुख साहेबराव हांडे, ईट गटात उपतालुकाप्रमुख राजाभाऊ नलवडे, विभाग प्रमुख श्रीमंत डोके, प्रभाकर वरबडे, चव्हाण आदी गावागावात जाऊन शेतकऱ्यांची जनजागरण करून गावभेट दौरे करत आहेत.