धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात नवोदय प्रवेश परीक्षा असो किंवा शैक्षणिक गुणवत्ता असो यामध्ये धाराशिव जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग मराठवाड्यात प्रथम क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात 2024 च्या असर अहवालानुसार धाराशिव चौथ्या क्रमांकावर आहे. 

जिल्हा परिषदेच्या शाळांना घरघर लागली असतानाच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जि. प. शाळेमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न चालू केला. त्यानुसार त्यांना यशही मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेंना ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नवोदय प्रवेश परीक्षा विशेष तयारी वर्ग जि. प. च्या शाळेत सुरू केले. त्यामुळे 80 पैकी 67 विद्यार्थी जि. प. शाळेचे यामध्ये यशस्वी झाले. जिल्ह्यातील 30 शाळेमधून सेमी इंग्रजी शिक्षणाची सोय जि. प. च्या शाळेत करण्यात आली. ग्रामीण भागात मुलींना पुढील शिक्षणाची सोय नसेल तर शिक्षण सोडावे लागते. त्यामुळे जि. प. शिक्षण विभागाने जिल्ह्यात 65 शाळांमधून इयत्ता 5 वीचे वर्ग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे शाळा भेट अभियान या अंतर्गत विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबविण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थितीत वाढविणे व शिक्षक उपस्थितीत व अध्यापनाची गुणवत्ता वाढविणे. शाळेतील मुलभूत सुविधा तपासणे आदी बाबीमुळे विद्यार्थी संख्या वाढत गेली. जि. प. शाळेत इयत्ता 5 वी व इयत्ता 8 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परिक्षेची तयारी करण्याकरिता सराव परिक्षेच्या माध्यमातून वर्षातून दोन वेळा परिक्षा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेत महिन्याच्या प्रत्येक शनिवारी दप्तर मुक्त शाळा हे अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांना गावातील पोस्ट ऑफिस, पोलिस स्टेशन, पंचायत समिती, बँक अशा विविध कार्यालयाला भेट देवून खेळ, नाट्य, कवायत आदींच्या माध्यमातून आनंददायी शनिवार साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे जि. प. शाळेचे शिक्षण म्हणजे यापूर्वी विनोदाचा विषय असायचा. गेल्या 1 वर्षापासून महावाचन चळवळीमुळे इयत्ता पहिली वर्गातील जवळपास 83 टक्के विद्यार्थी वाचन करू शकतात. विशेष म्हणजे 10 वी व 12 वी परिक्षेच्या निकालामध्ये धाराशिव जिल्हा लातूर विभागात पहिल्या क्रमांकावर चमकला आहे. 


सकारात्मक काम

जिल्हा परिषदचे सीईओ मैनाक घोष हे अतिशय सकारात्मक पध्दतीने काम करत आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाचे काम ही सकारात्मक होत आहे. शिक्षक, शिक्षकवर्ग, स्टॉफ या सगळ्यांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढत आहे. जिल्हा परिषदेच्या तडवळा सारख्या शाळेचा अभ्यास करून जिल्ह्यातील जि. प. शाळेत या सारख्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामुळे जि. प. च्या शाळेतून गुणवत्ता पूर्ण निकाल मिळत आहे. 

अशोक पाटील

शिक्षणाधिकारी जि. प. धाराशिव


 
Top