तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ  तुळजापूरात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, हे पर्यावरणीय संकट गंभीर रूप धारण करत आहे. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे ही समस्या अधिकच तीव्र होत आहे. विशेष म्हणजे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वाढत्या प्लास्टिक कचऱ्यासंदर्भात दोन दिवसापूर्वी तुळजापूरमध्ये चिंता व्यक्त केली होती. 

या वाढत्या कच-याचे परिणाम शहरात सर्वञ जाणवत आहेत माञ या समस्याची दखल घेण्यासकुणीही तयार नसल्याने या समस्येने गंभीर रुप धारण केले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील कचरा कुंड्या तसेच रस्ता आजबाजुला फक्त आणि फक्त प्लास्टिक कचरा दिसत आहे. तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवरील कचरा डेपो येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या आणि इतर प्लास्टिक कचरा जमा होत आहे. या  कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी लाखो रुपये नगरपरीषदचे खर्ची होतात. पण विल्हेवाट नगरपरीषद कशी लावते हा शोध विषय बनला आहे. कचऱ्यामुळे शहराच्या आजुबाजुच्या शेतातील मातीची सुपीकता कमी होत आहे आणि जलस्रोत प्रदूषित होत आहेत. 

प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडला जात आहे. तुळजापूरमध्ये प्लास्टिक कचऱ्याची समस्या गंभीर असून, याकडे  उपप्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण मंडळ लातूर व नगरपरिषद तुळजापूर यांचे दुर्लक्ष दिसत आहे. फक्त जागतिक पर्यावरण दिन साजरा करणे ऐवड्या पुरतेच यांचे काम मर्यादित राहिले आहे. निर्णयाप्रमाणे 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या एकल कॅरीबॅग वापरावर बंदी आली आहे. येथील प्लास्टिक कचरा वाढीस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 


प्लास्टिकमुळे नाल्या तुंबण्याचा प्रमाणात वाढ 

परवा महाव्दार रोडवरील नाली प्लास्टिकने तुंबुन सांडीपाणी थेट महाध्दार कडेगेले होतेइतर भागातील गल्लीबोळातील नाल्या प्लास्टिक अडकुन तुंबण्याचे प्रकार वाढत आहेत.


 
Top