भूम (प्रतिनिधी)- भूम आगारात कर्तव्यावर हजर न झाल्यामुळे भूम आगारातील तीन वाहक, एक चालक कम वाहक, व एक सहाय्यक कारागीर आगार प्रमुखांनी (ता. 2) जून रोजी निलंबित करण्यात आले असल्याची आगारातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
दिनांक 1 जून रोजी भूम-भोगलगाव-पुणे, भूम-वालवड-पुणे, भुम-नगर-पुणे या गाड्यासाठी एम. आर. जगताप, जी. एम. चौगुले, पी. डी. ठाकूर या वाहकांना तर एस. ए. वरळे या चालक कम वाहक निलंबित करण्यात आले आहे. तर दिनांक 30 मे रोजी कोल्हापूर भूम या गाडीचा परतत असताना दोन्ही काचा सह पुढील भाग अचानक निखळला या कारणाने सहाय्यक कारागीर गौतम ननवरे यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रभारी आगार प्रमुखांनी कर्मचाऱ्यांना निलंबित केले असले तरी भूम आगाराचा कारभार नियोजनबद्ध व काटेकोरपणे चालणार का ? यावर प्रश्नचिन्ह आहे. कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली. मात्र कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनीच कामांमध्ये नियंत्रण ठेवले नाही तर अधिकाऱ्यांवर वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाईचा बडगा काढला जाणार का ? कर्मचाऱ्यावर कारवाई केल्यानंतर खरंच एसटीचे चाक वेळेवर धावेल. सुरळीतपणा यावा हीच प्रवासी वर्गाची अपेक्षा आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भूम आगारांमध्ये चांगल्या पद्धतीने आगार व्यवस्थापनाचे कार्य करणाऱ्या आगर प्रमुखाची तात्काळ नेमणूक करणार.
अनघा बारटक्के
संभाजीनगर विभागीय आर एम
भुम आगारातील कारभाराबाबत व्यवस्थित पणा यावा सर्व गाड्या वेळेवर जाऊन प्रवाशाची गैरसोय होऊ नये यासाठी भूम येथे कायमस्वरूपी आगारप्रमुख तात्काळ द्यावा. अशी मागणी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष सुपेकर यांनी यावेळी केली आहे.
याबाबत माहिती घेण्यासाठी विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.
भुम आगाराबाबत रोज एक प्रकरण घडत असताना आज आत्ता पाच वाजेपर्यंत ही भूम पुण्याकडे जाणारी भोगलगाव-पुणे व तेरखडा मुक्कामी असणारी भूम-सोलापूर ही गाडी आज ही रद्द करण्यात आलेली आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत बस स्थानकामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणावर रस्ता नाही केवळ अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत व याचे खापर मात्र कर्मचाऱ्यावरती फोडण्यात येत असल्याची चर्चा कामगार वर्गात होत आहे.