भूम (प्रतिनिधी )- धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागील काही दिवसात संपूर्ण धाराशिव जिल्ह्यासहभुम वाशी परांडा मतदारसंघात अतिवृष्टी झालेली असून यामुळे सर्वत्र नुकसान झालेले आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून केळीच्या बागा, कांदा पीक आणि इतर फळबागेसह इतर सर्व शेतीमालचे नुकसान झालेले आहे. जिल्हाधिकारी यांनी परांडा, भूम आणि वाशी या तिन्ही तालुक्यात झालेल्या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सर्व नुकसानग्रस्ताना सरसकट मदत करण्यासाठी संबंधीतांना आदेशीत करावे अशी विनंती परांडा भूम वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे केली.