तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यात 30 मे पर्यत  झालेल्या अवकाळी पावसामुळें पंधरा गावातील सोळा शेतकऱ्यांचे 69.73 हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असुन यात सर्वाधिक नुकसान हे कांद्याचे झाले आहे. त्या खालोखाल आंबा, भुईमुग, उडीद सह टामटा, कलिंगड, पपइ, काशी भोपळा, ज्वारी यांचे नुकसान झाले आहे. 

काक्रंबा, चिवरी, इटकळ, फुलवाडी, नळदुर्ग, देवसिंगा तु., वडगाव देव, देवसिंगा न., शिराढोण, गवळेवाडी, जळकोटवाडी, मसला खु., सांगवी काटी, पांगरधरवाडी, गोंधळवाडी एकुण 15 गावातील 16 शेतकऱ्यांचे 69.73 हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे.


 
Top