धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्हा वार्षिक योजना सन 2024 -25 चा निधी सत्ताधारी भाजप व शिवसेना (शिंदे गट) यांच्या कुरघोडीच्या राजकारणातून स्थगित करण्यात आला आहे. धाराशिव हा आकांक्षीत जिल्हा असून सदर निधीच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील विकास कामे रखडले आहेत ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

तसेच नगरोत्थान योजनेअंतर्गत धाराशिव शहरासाठी 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून सदर कामाचे निविदा (टेंडर) प्रक्रिया सत्ताधाऱ्यांच्या कुरघोडीतून रद्द करण्यात आली असल्याने धाराशिव शहरातील प्रमुख 59 रस्ते व नाल्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहेत. याचा नाहक त्रास धाराशिव शहरातील जनतेला सहन करावा लागत आहे. तसेच धाराशिव नगरपरिषद येथे पुरेसा कर्मचारी व अधिकारी वर्ग नसल्याने शहरातील नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. याबाबत आज धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी महोदयामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले असून या निवेदनामध्ये सत्ताधारी पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचा त्रास धाराशिव शहर व जिल्ह्यातील जनता भोगत आहे. 

निवेदन देताना राजाभाऊ शेरखाने, सय्यद खलील सर, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, सिद्धार्थ बनसोडे, उमेश राजेनिंबाळकर, धनंजय राऊत, मूहिब शेख, अशोक बनसोडे, सरफराज काझी, प्रभाकर लोंढे, जयसिंह पवार, अभिमान पेठे, संतोष पेठे, अंकुश पेठे, महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष तनुजा हेड्डा, गोरोबा झेंडे, सय्यद मन्सूर आदी उपस्थित होते.

 
Top