तुळजापूर (प्रतिनिधी)-  सध्या श्रीतुळजाभवानी गाभाऱ्याचे वाढत चाललेले विद्रुपीकरण पाहता व देवी दर्शनार्थ दिवसेंदिवस भाविकांची वाढत जाणारी  संख्या पाहता पुढील पाचशे वर्षाचा भाविकांची संख्या लक्षात घेवुन प्रशस्त असा गाभारा करावा व गाभाऱ्याचे विद्रुपीकरण थांबवावे, अशी मागणी सांळुके यांनी   जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर  यांना निवेदन देवुन केले आहे.

श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांची संख्या प्रचंड वाढत असल्याने भाविकांना दर्शनार्थ वेळ लागत आहे. भाविकांचे सुलभ व समाधानकारक दर्शन  घडविण्यासाठी सध्याचा मुख्य  गाभारा, चोपदार गाभारा तसेच सिंह गाभारा प्रशस्त असने अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याला मूळ रूप प्राप्त करण्यासाठी भिंतीवरील स्टाईल व मार्बल काढण्यात आले. तेव्हा मंदिराचे शिखराचा भार पेलवणाऱ्या शिळांना तडे गेल्याचे उघड झाले. तसेच मुळ गाभारा तसेच चोपदार गाभारा व सिंह गाभाऱ्यातील छत व भिंती सुध्दा कमकुवत झालेले आढळून आला. सध्या भुगर्भातून गुढ आणि प्रचंड आवाजा सह जमिन हादरत आहे. आणि हे सर्व देवी मुर्तीच्या व भावीकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने फार धोकादायक आहे. गाभाऱ्याच्या छताला धोका होत असल्याने प्रशासन वारंवार छताला व दगडी पिलरना टेकन लावून वेळ मारुन नेत आहे. जागोजागी टेकन लावल्याने गाभाऱ्याचे विद्रुपिकरन होत आहे.देवि मुर्ती व भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन तात्काळ श्रीतुळजाभवानी देवीची मुळ मुर्ती मंदिरात इतरत्र स्थापना करुन देवी गाभारा व भवानीशंकर  हे सर्व काढून त्या ठिकाणी पुढील पाचशे वर्षाची भाविकांची वाढती संख्या विचारात घेऊन प्रशस्त गाभारा निर्माण करावा. अशी मागणी केली आहे. 


 
Top