धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामविकासात सक्रिय असून, स्वच्छता, पाणी पुरवठा आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या संयमी नेतृत्वशैलीमुळे ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबाबत आदराचे वातावरण आहे.
उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर सोनवणे यांनी ग्रामस्थांचे आणि सहकाऱ्यांचे आभार मानत, ग्रामविकास हाच आमचा मुख्य उद्देश असून, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहोत, असे आश्वासन दिले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कृषीचे विस्तार अधिकारी नडगे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक हमीद पठाण,तलाठी दयानंद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संजय पाटील, गोविंद पारवे, मधुमालती पारवे, मनिषा तानवडे, ज्योती पौळ, अश्विनी व्हरकट, पोलिस पाटील युवराज पाटील आदी सदस्य उपस्थित होते. निवडीवेळी छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, संजय पारवे, प्रशांत उकरंडे, भास्कर पारवे, संगाप्पा उकरंडे, तानाजी पारवे, बाळू गवळी, अनिल जाधव, चंद्रशेखर उकरंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते.