धाराशिव (प्रतिनिधी)-  विद्यार्थ्यांना कौतूकाची थाप घेताना जवाबदारी पण पेलता आली पाहिजे. शिक्षण हे माणसाला उन्नत करते, विद्यार्थ्यांनी शिकून, समृध्द होवून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे प्रतिपादन खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले.

ब्राह्मण कल्याण ट्रस्ट, धाराशिवच्या वतीने काल शनिवार, 7 जून रोजी येथील परिमल मंगल कार्यालयात आयोजित गुणगौरव सोहळ्यात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून धाराशिवच्या माजी नगराध्यक्ष तथा यशस्वी उद्योजिका डॉ. उर्मिला गजेंद्रगडकर, जेष्ठ लेखीका, निवेदिका अर्पणा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. उर्मिला गजेंद्रगडकर व अर्पणा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यात 10 वी, 12 वी मधील सुमारे 70 गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. वैभव विजयकुमार घुगीकर, अनिरुध्द मुकूंद कुलकर्णी या दोघांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुजा गंधोरकर, सुत्रसंचालन डॉ. स्वप्नगंधा कुलकर्णी यांनी केले. तर उपस्थितांचे आभार अर्पणा पाठक यांनी मानले. कार्यक्रमासाठी गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 
Top