भूम (प्रतिनिधी)- पंढरपुर - कुर्डवाडी - परंडा - चौसाळा- बीड -जालना मार्गे शेगांव रेल्वे मार्गासाठी रेल्वे कृती समितीच्या वतीने गुरुवार (ता. 5) रोजी धाराशिव येथे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

पंढरपूर ते शेगाव हा प्रस्तावित रेल्वेमार्ग महाराष्ट्राच्या आर्थीक, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. सद्यस्थितीत शेगाव ते खामगाव आणि पंढरपूर ते कुर्डूवाडी या दरम्यान रेल्वे सेवा सुरू आहे. तथापि, यामधील उर्वरित मार्ग अद्याप अपूर्ण असल्यामुळे प्रवाशांना आणि भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 2018-19 मध्ये संभाजीनगर-बीड-धाराशिव या नवीन रेल्वेमार्गास मान्यता देण्यात आलेली आहे. या प्रस्तावित मार्गात खामगाव,जालना, गेवराई, कुर्डूवाडी, परांडा, भूम, वाशी ही ठिकाणे समाविष्ट केल्यास, शेगाव-पंढरपूर-कोल्हापूर दरम्यान थेट रेल्वे सेवा सुरू होऊ शकते. या रेल्वे मार्गामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल शेगाव (गजानन महाराज), तुळजापूर (तुळजाभवानी देवी), अक्कलकोट (स्वामी समर्थ), पंढरपूर (विठ्ठल-रुक्मिणी),कुंथलगिरी येथील तीर्थक्षेत्र या प्रमुख धार्मिक स्थळांसह इतर 14 विविध धार्मिक क्षेत्र यांना जोडणारा हा मार्ग भाविकांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. औद्योगिक व सामाजिक विकास मागास भागांतील खामगाव, जालना, बीड, धाराशिव या ठिकाणांना रेल्वे जंक्शनचा दर्जा मिळून स्थानिक उद्योग, व्यापार आणि पर्यटनास चालना मिळेल. नवीन रोजगार संधी रेल्वेसेवेच्या माध्यमातून विविध प्रकारचे रोजगार उपलब्ध होऊन युवकांना स्थानिक स्तरावरच संधी मिळतील. वाहतूक सुलभीकरण रस्ते वाहतुकीवरील भार कमी होऊन पर्यावरणपूरक व सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे एक उत्कृष्ट पर्याय ठरेल, शेगाव ते पंढरपूर या रेल्वेमार्गाच्या उर्वरित कामास तातडीने मंजुरी देऊन, संपूर्ण मार्गावर रेल्वेसेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी रेल्वे कृती समितीने करण्यात आले .यावेळी रेल्वेचे समितीचे तानाजी पाटील, दिलीप शाळू महाराज, ॲड. रामराजे सांळुके, अनिल शेंडगे, अलिम शेख सर,वसंत यादव सर, फैजान काझी, गणेश नलवडे संजय पाटील आरसोली  कर, विलास शाळू, संतोष वराळे, जगताप अण्णा परांडा,आदिनाथ पालके, कोहिनूर सय्यद, राम खंडागळे, उमेश गोरे, आदी उपस्थित होते.

 
Top