तुळजापूर (प्रतिनिधी)-   अमेरिकेसमोर बाजपायी, नेहरु ने घुटने टेकले नाहीत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घुटने टेकल्याने हे घुटने टेकु सरकार असुन आता घुटने टेकणे बंद करावे. असे प्रतिपादन समाजवादी पक्षाचा मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष आमदार अबु आझमी  यांनी केले  

यावेळी व्यासपीठावर  प्रदेश उपाध्यक्ष डाँ प्रभाकर जोशी, महासचिव परवेज सिध्दीकी, सचिव अनीस शेख, रउफ शेख, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णा रोचकरी, जिल्हाध्यक्ष अमिरभाई शेख, गणेश रोचकरी सह अनेक मान्यवर उपस्थितीत होते. 

यावेळी मार्गदर्शन करताना आजमी पुढे म्हणाले कि महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हत्या, बलात्कार, शेतकरी आत्महत्या रोज घडत आहे. हे झोपलेले सरकार आहे. हा देश शेतकऱ्यांचा आहे पण महाराष्ट्रात सर्वाधीक आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत आहेत. हे सरकार बईमानी करुन गलत काम करुन सत्तेवर आले आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे कामे आणा ते मी सोडवुन देता. आगामी नगर परीषद, जिल्हा परीषद, पंचायत समितीमध्ये समाजवादी पार्टीला विजयी करण्याचे आवाहन केले. या मेळाव्यास प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते.


 
Top