तुळजापूर (प्रतिनिधी)- सह्याद्री फाउंडेशन च्या वतीने 6 जून रायगडी होणाऱ्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी एक लाख एक हजार रुपये अर्पण केले.
यावेळी बोलतान योगेश केदार म्हणाले की, एक शिवभक्त या नात्याने आपली जबाबदारी समजून राज्याभिषेकासाठी फुल नाही फुलाची पाकळी आज छत्रपती संभाजी महाराजांकडे सोपवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राष्ट्रावर अनंत उपकार केले आहेत. त्यातून आपण उतराई होऊ शकत नाही. याची जाणीव मनात ठेऊन ही राशी दिली. मी म्हणालो राजे रक्कम तशी कमी आहे पण तुमच्या प्रती अन् महाराजांच्या प्रती आमचा भाव मोठा आहे. आपण त्याचा स्वीकार करावा. हा मदत घेताना छञपती संभाजी महाराजांना थोडेसे गहिवरून आले होते. ऐतिहासिक राज्याभिषेक जगभर पोहोचला पाहिजे या ध्येयाने मागच्या अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांनी अहोरात्र कष्ट केले आहेत.
काही वर्षे मी स्वतः महाराजांच्या सोबत राहिलो असल्याने प्रत्यक्ष साक्षीदार आहे. दिल्ली असो की न्यूयॉर्क, राजेंनी जगभरातील लाखो शिवभक्त गडासोबत जोडण्याचा प्रयत्न केलाय. रायगडावर राष्ट्रपती पासून ते विविध देशांच्या राजदूत आणून त्या लोकोत्सव वेगवेगळे कार्यक्रम केले आहेत. आज सोहळा आखीव रेखीव वैभवशाली दिसतोय तो तसा उत्सव करण्यात संभाजीराजे, युवरज्ञी राजे तसेच शहाजीराजे यांनी मोठे परिश्रम केले आहेत.