तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील काटगाव येथील सरपंच अशोक दगडू माळी यांना अपात्र घोषित करून त्यांचे सरपंच रद्द करण्याच्या आदेश छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. काटगावच्या सरपंचाचे पद रद्द झाल्याने काटगाव परीसरातील राजकारणात खळबळ उडाली आहे.या ग्रामपंचायत चा भष्ट्राचार अनागोंदी मनमानी कारभाराचे लक्तरे दैनिक पुण्यनगरीत प्रसिध्द झाले होते. 

तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील सरपंच  अशोक दगडू माळी यांच्याविरुद्ध सुनील राजाराम रोकडे मौजे काटगाव तालुका तुळजापूर व इतर यांनी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या न्यायालयात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) नुसार तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव व गटविकास अधिकारी पंचायत समिती तुळजापूर यांचे अहवाल मागून घेण्यात आले होते. ज्यामध्ये असे आरोप ठेवण्यात आले होते की, सरपंच जे गावात मनमानी कारभार करून ग्रामपंचायतमध्ये जमा झालेली रक्कम ग्रामनिधीमध्ये जमा न करता परस्पर हातावर खर्च करून अनियमित्ता केल्याचे स्पष्ट होते, विविध लोकांना अधिकार नसताना वारस प्रमाणपत्र देणे, ग्रामपंचायत 100/- रुपयाचे आदर आधारे मालमत्तेचे हस्तांतरण नोंद मंजूर करून घेणे व नमुना नंबर 8 वर नोंद घेणे, आर्थिक अनिमित्तता, अधिकार नसताना मनीषा खोबरे व रेवन खोबरे यांना रहिवाशी प्रमाणपत्र देणे, शासकीय नियमाप्रमाणे मागासवर्गीय विकासाकरता 15% तसेच दिव्यांग कल्याण करता 3% टक्के रक्कम खर्च न केल्यामुळे, यासह इतरही अनेक आरोप सिद्ध झाल्यामुळे अशोक दगडू माळी सरपंच ग्रामपंचायत काटगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39(1) चे उल्लंघन केल्यामुळे  त्यांना ग्रामपंचायतच्या सरपंच पदावरून सांप्रत कालावधीसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे, याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांचा अहवालही त्यांचे विरोधात गेलेला होता यातील सर्व आरोप सुनावणीअंती सिद्ध झाले होते.

तुळजापूर तालुक्यातील काटगाव गावचे सरपंच अपात्र झाले असुन त्यांचे सरपंच पद रद्द झाल्याने काटगाव परिसरात खळबळ उडाली असून या राजकीय घडामोडीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

 
Top