तुळजापूर (प्रतिनिधी)-तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा वाडी येथील केंद्रीय सौर प्रकल्पच्या जागेवर अतिक्रमण हटवन्याबाबत दि.20 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव व पंचायत समिती कार्यालय तुळजापूर यांना भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेचे तालुका अध्यक्ष बालाजी जाधव यांनी निवेदन दिले आहे.

निवेदनात असे नमूद केले आहे की,तुळजापूर तालुक्यातील काक्रंबावाडी येथील गायरान व गावठाण गट नं. 01 वर 1972 वर्षा पासून या जागेवर केंद्र सरकारचा सौर प्रकल्पावर पाण्याचा बोर व टाक्या तयार करण्याचा प्रकल्प होता. आता या जागेवर कोणताही प्रकल्प चे काम होत नाही. आता त्या जागेवर कोणतीही परवानगी नसताना अनधिकृत बांधकाम केले गेले आहे. त्या जागेवर आता अतिक्रमण केले आहे. तरी या जागे वरील अतिक्रमण लवकरात लवकर हटविण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर बालाजी जाधव यांची स्वाक्षरी आहे.


 
Top