भूम (प्रतिनिधी)- अमृत दोन योजना भूम शहराला लागू करू नये. यासाठी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांनी ता 24 रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेत भूम शहर बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे. असे आवाहन केले आहे . अमृत योजनेअंतर्गत नर्याला मीटर लागून आर्थिक वृद्ध लागणार असल्याचे निषेधार्थ नागरिक व्यापारी बंधू सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी भूम शहर बंद ठेवावे गोलाई चौकात सकाळी 11 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी माजी नगराध्यक्ष थोरात यांनी केले.भाजपा तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, भाजपाचे आबासाहेब मस्कर,काँग्रेस तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे,बाबासाहेब वीर,चंद्रमणी गायकवाड ,माजी नगरसेवक उमेश माळी इतर पदाधिकारी उपस्थित होते.