भूम (प्रतिनिधी)- अमृत दोन योजना च्या नवीन जलवाहिनीद्वारेच पाणी आणण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत व शहरातील नागरिकांच्या  उपस्थितीत सर्वानुमते घेण्यात आला. साहिल मंगल कार्यालयात भूम शहर पाणी कृती समितीची बैठक (ता 10 ) रोजी पार पडली. या बैठकीमध्ये शहर पाणीपुरवठा योजनेच्या विषयी चर्चा करण्यात आली. राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्याकडून अमृत दोन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणण्यात आणली आहे. शहरात सद्यस्थितीला 4374 नळधारक आहेत. यासाठी आरसोली प्रकल्पातून पाणीपुरवठा करणारा पंपाची क्षमता 90 एचपी आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज 22 तास चालू ठेवल्यानंतर 20 लाख लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र शहराला दररोज 67.50 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. अमृत दोन योजनेत पंप हाऊस ची क्षमता 170 .एचपी आहे . जलशुद्धीकरण केंद्र देखील त्यानुसारच आहे .योजना पूर्ण होण्यासाठी एक ते दीड वर्ष लागणार आहे .रस्ते पुन्हा खराब होऊ नये त्यासाठी आतापासूनच नळद धारकांना कनेक्शन देणे सुरू केले आहे .या विषयावर शहरातील नागरिकांची विरोधक दिशाभूल करत आहेत .विरोधक निवडणुका समोर ठेवून विरोध करत आहेत .शहरातील नळ धारकांना सध्या दोन दिवसात पाणीपुरवठा केला जातो .अमृत दोन योजना पूर्णत्वास नाही झाली तर भविष्यात शहराला .दहा ते पंधरा दिवसातून एकदा पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही .नळधारकांना कनेक्शन देताना मीटर बसविणे हा या योजनेच्या प्रक्रियेचा एक भाग आहे .महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नगर परिषदेने ही योजना घेतली आहे त्या त्या ठिकाणी हे मीटर न धारकांना बसविण्यात येणार आहे .अमृत दोन योजनेतील पाणी पट्टीचा दर लोकनियुक्त सदस्य हे ठरवणार आहेत .नागरिकांच्या हिताचाच निर्णय घेणार आहोत . 1974  च्या पुढे 2007 साली पाणीपुरवठा योजना करण्यात आली .त्यामध्ये 11 किमी होती .शहरातील वाढलेल्या भागात,सध्या उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नाही .या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती आहे .अमृत दोन योजना पूर्णत्वास न गेल्यास पूर्वीप्रमाणे पाणीटंचाई होऊ शकते .शहरातील कसबा , गालीब नगर ,लक्ष्मी नगर ,कुसुम नगर ,एस पी कॉलेजच्या पाठीमागे,इंद्रा नगर ,शिवशंकर  ,रायरंद वस्ती ,आकरे गल्ली ,वीर गल्ली या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे .या योजनेमुळे या भागात पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे .पाणी गळती थांबवूनप्रतिदिन 49 . 50लक्षलिटर पाणीपुरवठा म्हणजे.प्रति माणसी 135 लिटर पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत दोन योजना केंद्र सरकारने केली आहे . यावेळी कूती समितीचे अध्यक्ष तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गाढवे भूम शहराचे माजी नगराध्यक्ष संजय गाढवे डॉक्टर रामराव कोकाटे रोहन जाधव अरुण देशमुख ऍडव्होकेट पंडित ढगे प्रभाकर हाके रणजीत साळुंखे संजय होळकर नारायण वरवडे पि टी  जाधव अमोल शिंदे योगेश आसलकर यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष तोफिक कुरेशी हे उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी अमृत टू या योजनेबाबत सविस्तरपणे शहरवासीयांना माहिती देऊन सदर योजनेचे पाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने शहरवासीयांना उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही दिली

 
Top