धाराशिव (प्रतिनिधी)- मे महिन्यात अतिवृष्टीनंतर जून महिन्यातही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे.  त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढू लागला आहे. 18 जूनपर्यंत जिल्ह्यातील 226 प्रकल्पापैकी 19 प्रकल्प तुडूंब भरले आहेत. प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठी 36 टक्क्यांवर पोहोचला आहे. जिल्ह्याची पावसाची सरासरी 770.7 मिमी असून, जिल्ह्यात सरासरी 399.5 मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. 

जिल्ह्यात एकूण 226 प्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील पाण्यावरच शहरे व ग्रामीण भागातील 350 पैकी अधिक गावांची तहान भागवली जात आहे. मे महिन्यात अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. 34 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. जून महिन्यातही मान्सूनचा पाऊस सर्वत्र दमदार झाला. पावसामुळे नदी, ओढेही जून मध्येच वाहू लागले. 18 जूनपर्यंत तब्बल 19 प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. 15 प्रकल्पात 75 टक्क्यापेक्षा अधिक पाणीसाठा आहे. 28 प्रकल्पांमध्ये 51 ते 75 टक्के पाणीसाठी आहे. 59 प्रकल्पांमध्ये 26 ते 50 टक्के जलसाठा आहे. 75 प्रकल्पात 25 टक्क्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. जून महिन्यातही दमदार पाऊस झाले. त्यामुळे जुलै महिन्यातच निम्म्यापेक्षा अधिक प्रकल्प भरण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत प्रकल्पात 267.486 दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 36.79 आहे. 

 
Top