तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मसलाखुर्द येथे अवकाळी पावसामुळे बबन विठ्ठल वीर यांच्या शेतातील काढणीस आलेला उडीद पाण्यात गेल्याने उडदाचे नुकसान झाले आहे. बबन वीर यांना साडेचार एकर शेती असुन त्यातील एक एकरमध्ये उडीद लावला. तो जोपसला, याला सुमारे वीस ते बावीस हजार खर्च आला. आता उडीद काढायाचा म्हटलं कि पाऊस सुरु झाला. पाऊस लागल्याने पाणी साचुन तो खराब झाला. यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असुन कुठल्याही शर्ती अटीचा विचार न करता पंचनामा करुन तात्काळ खरीप पुर्व पेरणीसाठी शासनाने अर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.