तुळजापूर (प्रतिनिधी)- येथे रविवार दि. 25 मे रोजी  सकल मराठा समाजाच वतीने आयोजित  मराठा समाजातील मोफत वधू-वर परिचय मेळाव्यात 562 मुले व फक्त 79 मुलींचे परिचय पञ संयोजन समितीकडे जमा झाल्याने मुलींच्या (वधु) टंचाईची भीषण सत्य समोर आले. या मेळाव्यात 1509 वधुवर पालकांनी माञ सहभाग नोंदवला. यावेळी ल लग्न जुळवताना पैशाचा व्यवहार करु नका असे आवाहन केले. यावेळी  वधू टंचाईचे ची दाहकता समोर आली. विशेष म्हणजे कर्नाटकातील वधुवरांचे पालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

तुळजापूर येथे घेण्यात आलेल्या वधूवर सुचक मेळाव्यात संयोजक अशोक गायकवाड म्हणाले कि, 'वर्तमानकाळात मुले व मुली उच्चशिक्षित आहेत. लग्नासाठी त्यांच्या व पालकांच्या खूपच अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे  लग्न जुळविताना आजकाल पालकांना बरेच प्रयत्न व संघर्ष करावे लागत आहेत. मुलीनी श्रीमंती पाहुन लग्न करु नये मुलगा होतकरु कमवता निरव्यसनी पाहुन लग्न करावेत. 

या मेळाव्यात 1509 वधु-वर व पालकांनी सहभाग घेतला. यामध्ये 562 मुले व फक्त 79 मुलींचा सहभाग होता. या मेळाव्यात मोठ्या संख्येने मराठा समाजातील पालकांनी भाग घेतला असला तरी त्यात विक्रमी 562 मुलांचे तर मुलींचे केवळ 79 परिचय पत्र संयोजन समितीकडे जमा झाल्याने मुलींच्या टंचाईची दाहक स्थिती पुन्हा एकदा समोर आली असल्याचे दिसून आले आहे.  

या मेळाव्यात  धाराशिव, पुणे, सोलापूर, लातूर, मुंबई, बिदर, सांगली, सातारा, कोल्हापूर, बार्शी, खटाव, बारामती, शिरूर, पिंपरी-चिंचवड, भोसरी येथील मराठा समाजाचे वधु-वर व पालक सहभागी झाले होते.  पहिल्या सत्रात वधू-वर नोंदणी व दुसऱ्या सत्रात संयोजन समितीचे अशोक गायकवाड यांच्यासह वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. मेळाव्या यशस्वीतेसाठी सकल मराठा समाजाचा मंडळीनी परिश्रम घेतले.  


 
Top