तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर या धार्मिक नगरीचे पाविञ जपण्यासाठी व वातावरण चांगले राहण्यासाठी अशा शिबीराची नितांत आवश्यकता आहे. असे प्रतिपादन सिने-नाट्य अभिनेता संदिप पाठक यांनी पंचरंगवतीने आयोजित व्यक्तीमत्व विकास शिबिरात मार्गदर्शन करताना केले.
यावेळी बोलताना पाठक म्हणाले कि, श्री. तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीत राजकीय, सामाजिक, वातावरण निस्वार्थी, निरपेक्ष, समाजाभिमुख,प्रगत होण्यासाठी अश्या शिबीराची नितांत आवश्यकता आहे. बंद पडलेला पण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेला श्री तुळजाभवानी सांस्कृतीक महोत्सव परत सुरु करण्याची विनंती शिबिरात आलेले सिनेनाट्य अभिनेते संदिप पाठक, तुषार भद्रे, डॉ. संजय पाटील देवळाणकर, यांनी मार्गदर्शन करताना केली. या शिबीरात अभिनेते नाट्य दिग्दर्शक लेखक तुषार भद्रे, डॉ. संजय पाटील देवळाणकर व सिनेनाट्य अभिनेते संदिप पाठक तसेच अनिरुद्ध खुटवड यांनी मार्गदर्शन केले.
या शिबीर यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्रीकांत नाडापुडे, प्रा.संभाजी भोसले जगदिप तिकोने, प्रा.डॉ. शिवाजी जेटीथोर, अँड. दत्तात्रय घोडके, प्रशांत शेटे, अँड. अक्षय जाधव, संतोष शामराज, प्रकाश हुंडेकरी, नारायण नन्नवरे, नरसिंग बोधले अदिनी परिश्रम घेतले. तसेच या शिबिर यशस्वीतेसाठी प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेते दिलीप भोसले, उमेश जगताप, योगेश राऊत, शंतनु गंगणे यांचे सहकार्य लाभले.