भूम (प्रतिनिधी)-भूम नगरपरिषद अमृत 2 .योजनांची पाणीपुरवठा पाईपलाईन व वाशी शहराची पाणीपुरवठा पाईपलाईन .इतर तलावातून करावी या मागणीसाठी सहा गावच्या शेतकऱ्यांनी आरसोली प्रकल्पामध्ये जलसमाधी सकाळपासून च आंदोलन चालू केले होते .उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .तब्बल चार तास जलसमाधी आंदोलन चालू होते. तालुक्यातील आरसोली, वंजारवाडी, हिवरा, हाडोग्री, दिंडोरी, या गावातील शेतकऱ्यांनी मिळून भूम व वाशी शहराला वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन योजना बाणगंगा किंवा इतरत्र तलावातून कराव्यात आरसोली प्रकल्पातून करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी यावेळी केली.
गतवर्षी पत्र देऊन भूम शहरास बाणगंगा तलावातून तीन किलोमीटर अंतरावरील तलावातून भूम नगर परिषदेस पूर्वीची पाणीपुरवठा योजना सुरू करण्याबाबतचे आदेश देऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु नगर परिषदेने कोणतीही दखल न घेता वंजारवाडी तलावावर पूर्वीची योजना चालू असताना नवीन अमृत-2 या योजनेंतर्गत 42.40 कोटींची योजना वंजारवाडी तलावावरून सुरू केली जाणार आहेत. वंजारवाडी तलावावर वाशी शहराची देखील पाणीपुरवठा योजना सध्या कार्यान्वित आहे. वाशी नगरपंचायतीनेही नगरोत्थान योजनेंतर्गत 50.42 कोटींची योजना याच तलावावर मंजूर करून घेतली. आरसोली हा लघू पाटबंधारे प्रकल्प असून या योजना चालू झाल्यास वंजारवाडी, आरसोली, हाडोंग्री, हिवरा, दिंडोरी व कोरेगाव या गावच्या शेतीच्या सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे शासनाने या दोन्ही शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजना इतर तलावामधून कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे. प्रभाकर डोंबाळे, प्रताप पाटील ,राजेद्र मिसाळ, बालाजी सावंत, सदीप मगर, प्रशांत कदम, विलास पाटील ,सुधिर क्षीरसागर, राम सावंत, सधीर वाघमारे, शैलेश काळे, शाहाजी जगदाळे, शेषेराव मिसाळ, शेषेराव बर्वे, आमोल डोंबाळे, रविद्र लोमटे ,भाऊ काळे, नाना मोटे, वैभव मोटे, सर्जेराव डोंबाळे, राजेद्र गपाट यांच्यासह महिला व हजारो शेतकरी जलसमाधी आंदोलन स्थळी उपस्थित होते.