धाराशिव (प्रतिनिधी)- आपल्या मालकाचे 15 टक्के बुडाले याच तीव्र दुःख झाल्याने भाजपची मंडळी आता फडफड करू लागली आहे. तुम्ही ज्या विद्यापीठाचा उल्लेख करताय ना त्याचे संस्थापकच राणा पाटील आहेत. फक्त टक्केवारीसाठी व आपल उखळ पांढरे करण्यासाठी राणा पाटील भाजपात गेलेत. दुसऱ्या बाजूला ही दोन निष्ठावंत म्हणून देशात प्रसिध्द आहेत. तुमच्या कुल्हेकुहीनी काही फरक पडणार नसल्याचा पलटवार ठाकरे सेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी लागवला आहे.

यावेळी गुरव म्हणाले, पहिला मुद्दा ही कामे रखडली टक्केवारीसाठी अगदी बरोबर आहे. तुमचे मालक व दुसरे माजी पालकमंत्री यांच्या भांडनात ही कामे रखडली आहेत.  यामुळे आमची मागणी आहे की मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करा म्हणजे तुमच्या विद्यापीठ संस्थापकाच खरं रूप समोर येईल. ही कामे व्हावेत यासाठी सत्तेत असताना तुम्ही विरोधी मंडळीवर टक्केवारीच कारण सांगणं हास्यास्पदच नव्हे तर मुर्खपणा म्हणावा लागेल. दुसरं हे अंदाजपत्रकीय दराचे धोरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यासाठी बनविल्याचे तुम्ही सांगताच. इतके दिवस तुम्हाला या धोरणाची माहिती नसावी कदाचित कारण धाराशिवच्या कामाबाबत निर्णय हा दोन मे च्या पत्रात नमूद केला आहे. भुयारी गटार योजनेचे तुम्हाला एवढे वावडे होते तर भाजप देखील शिवसेनेबरोबर सत्तेत होती. तेव्हा त्याला विरोध करण्याची बुध्दी सुचली नाही काय? शिवाय प्रत्येक पक्षाचे त्यावेळी काढलेले जाहीरनामे तपासा आणि मग योजनेबद्दल बोलावे असा टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला. 

 
Top