कळंब (प्रतिनिधी)- कळंब येथे संस्कृत क्लासेस मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतिश टोणगे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार बालाजी आडसुळ, पंढरीनाथ मगर साह्यक पोलीस निरीक्षक, अंमलदार परमेश्वर कदम, प्रकाश मांडवकर, सोमनाथ गंभीरे, रवि उबाळे, लहाने हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्कृत शिक्षक हभप. बळीराम कवडे यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यादेवी सरस्वती पुजनानी झाली. क्लासेसची विद्यार्थ्यीनी कु.सई काळे हीने सुंदर अभंग गायला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक पठण केले. अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी आपल्या परिक्षेतिल गुणा बरोबरच आपल्या अंगातील सुप्त कला कुणालाही तितकेच महत्व द्यावे असे प्रतिपादन केले. प्रमुख पाहुणे यांनी संस्कृत, संस्कार आणि संस्कृती जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे संबोधले. तसेच भविष्यात स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी लागेल या बद्दल पंढरीनाथ मगर आणि परमेश्वर कदम यांनी मार्गदर्शन केले. सिध्दि पवार व अनुष्का कस्पटे या विद्यार्थींनीनी आपलै मनोगत व्यक्त केले. या वेळी भरपूर मार्क पडले म्हणून हुरळून न जाता, अभ्यासात सातत्य ठेवावे, ज्यांना कमी मार्क पडले त्यांनी नाराज न होता , अभ्यास करावा असे प्रतिपादन सतीश टोणगे यांनी केले.सर्व मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात पैकीच्या पैकी गुण घेऊन संस्कृत विषयात अव्वल स्थान प्राप्त करणारे अक्षरा शेळके.100, ओम शेळके 100 , इखे अशितोष 100, कसपटे अनुष्का 100, अव्वल स्थानापासून एक गुणानि दुर असनारे पांगळ मोहित 99, काळे सई 99, खंडागळे तृप्ती 99, आर्यन गिरी 99,कसपटे हर्षदा 99, जाधव तन्मय 99, जाधव सिद्धि 99, पवार आनंद 99, श्रेया इंगळे 99, वाघमारे वैशाली 99, जाधव यश 99, आणि इतर 90 पेक्षा जास्त मार्कस् घेण्या-या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला .तसेच एस.आर.पी.एफ.च्या परीक्षेत यश मिळवलेल्या अभिजीत दिलीप तेलंग या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी प्रास्ताविक बळीराम कवडे तर आभार प्रदर्शन लहाने यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वंदिता कोठावळे, प्रांजल चौधरी, तन्मय गंभीरे, ऋषी गंभीरे विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.