परंडा (प्रतिनिधी)- तालुक्यात सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे फळबागा, पशुधन व शेती पिकांचे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकाऱ्यांना योग्य ती मदत करावी. यासाठी भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याच्या वतीने निवेदन दिले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंद बप्पा रगडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, किसान मोर्चा तालुका सरचिटणिस शिवाजी पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाडूळे,  खासगावचे माजी सरपंच नागेश शिंदे, रामदास गुडे, किरण कवटे, सोशल मीडिया संयोजक जयंत सायकर तसेच तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

 
Top