भूम (प्रतिनिधी)- सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानातून अधिकृत शिधापत्रिकाधारकांना तांदूळ, गहू असे धान्य वितरीत केले जाते. शिधापत्रिकेत ऑनलाइन नोंद असलेल्या सर्व कार्डधारकांनी आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून ई. केवायसी. करणे क्रमप्राप्त असून सर्व ग्राहकांनी आपली ई केवायसी करून घेणे बंधनकारक आहे. सर्वांनी या बाबत सहकार्य करावे. असे भूमचे तहसीलदार व पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभमिळणार नाही, असे भूम चे तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांनी लवकरात लवकर आपल्या सरकार मान्य स्वस्त धान्य दुकाननात ई-केवायसी करावी किंवा भूम तहसील परिसरात देखील ई-केवायसी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी ज्या नागरिकांनी ई-केवायसी केली नसेल अश्या नागरिकांनी ई-केवायसी
करण्याचे आवाहन तहसीलदार जयंत पाटील व पुरवठा निरीक्षक अधिकारी मनीषा चाहाणकर यांनी केले आहे.