भूम (प्रतिनिधी)- भूम येथील समस्त कोष्टी समाजाचे मानकरी कल्याण राऊळ यांना अर्धांग वायू सारखा आजार झाल्याने उपचारार्थ समाज बांधवांनी वर्गणी गोळा करून त्यांना मदतीचा हात दिल्याबद्दल समाजातून समाधान व्यक्त होत आहे.
अधिक माहिती की, शहरातील जवळपास 300 पेक्षा अधिक घरे आणि 3000 लोकसंख्या असलेल्या कुटुंबातील प्रत्येकाशी नियमित संपर्क असलेले, समाजातील प्रत्येक कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची जबाबदारी असलेले व गेल्या अनेक पिढया पासून समाजाचे एक प्रकारचे मानकरी असलेले कल्याणराव राऊळ यांना काही दिवसापूर्वी अर्धांग वायू सारखा आजार झाला.
कल्याण राऊळ यांना बार्शी येथील मोठ्या रुग्णालयामध्ये दाखल करावे लागले. त्यांची कौटुंबिक, आर्थिक परिस्थिती हलाखीची व गरिबीची असल्याने समस्त कोष्टी समाज बांधवांच्यावतीने व ट्रस्टच्या पुढाकाराने आर्थिक मदत गोळा केली. यामध्ये अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने कमी अधिक प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समाजातील ज्येष्ठ समाज बांधव अंबादास वरवडे , प्रकाश बागडे, ट्रस्ट अध्यक्ष विठ्ठल बागडे, सदस्य नवनाथ रोकडे, योगेश असलकर, पुजारी राम बाबर, उमेश ढगे, अशोक बोत्रे, दत्ता बोत्रे, विशाल रेपाळ, ज्ञानेश्वर टकले, मोतीलाल असलकर, श्याम बागडे, संदीप बागडे आदींची उपस्थिती होती.