कळंब (प्रतिनिधी)-आजच्या विज्ञान युगामध्ये माणसे नेहमी वेळ पाहून बदलतात या बदलामुळे समाजात माणसे माणसात राहत नाहीत त्यामुळे वेगवेगळ्या घटना ह्या पाहावयास मिळत आहेत . आजच्या काळात विज्ञानवादाची  माणसाने कास धरून  नेहमी प्रभू श्रीराम सारखे एक वचनी , एक बाना , एक पत्नी असे वागण्याची आज समाजामध्ये गरज आहे . असे मत ह.भ.प. विलास पिंगळे महाराज यांनी आपल्या मधुर वाणीच्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून व्यक्त केले .

 कळंब तालुक्यात मंगरूळ शिवारात राम मंदिरात  येथे  श्रीराम नवमी (राम जन्मोत्सव ) निमित्त  हरी कीर्तनामध्ये दि . ६ रोजी दुपारी  किर्तन सेवेच्या माध्यमातून  ह.भ.प. विलास पिंगळे महाराज बोलत होते पुढे म्हणाले की भगवंत माणसाकडून काही अपेक्षा करत नाही भगवंताला फक्त भक्ताकडून नामस्मरणाची गरज आहे एवढीच माफक अपेक्षा करतो जो देवाची भक्ती करतो तो जीवनात यश मिळवतो हे मात्र सत्य आहे  .  कीर्तनाच्या शेवटी आरती करुन कीर्तन सेवा ही महाप्रसादाचे वाटप करून समाप्त करण्यात आली याप्रसंगी गावातील बहुसंख्य लोक या किर्तन सेवेला उपस्थित होते . 


 
Top