धाराशिव (प्रतिनिधी)- मोदी सरकारकडून सुरु असलेल्या ईडीच्या गैरवापराविरोधात धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सत्तेच्या नशेत असलेले मोदी सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या मा.खा. सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांच्यावर निराधार खटले लादून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, हे कोणत्याही किंमतीत सहन केले जाणार नाही.
केंद्रातील मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेसच्या वतीने आज धाराशिव येथे काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. निदर्शनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष एडवोकेट धीरज पाटील, उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष विनोद वीर, डी सी सी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योतीताई सपाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, आप्पासाहेब शेळके, विचार विभागाचे राष्ट्रीय समन्वयक ॲड.राज कुलकर्णी, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी विभाग प्रमुख धनंजय राऊत, अल्पसंख्याक विभाग प्रमुख आयूब पठाण, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, ॲड.जावेद काझी, भारतयात्री सरफराज काझी, प्रा.वसंत मडके, मानवाधिकार विभागाचे प्रमुख प्रभाकर लोंढे, अभिमान पेठे, युवक काँग्रेसचे सलमान शेख, सौरभ गायकवाड, संतोष पेठे, महादेव पेठे, सुनील बडूरकर, अंकुश पेठे, शहाजी मुंडे सर, कानिफनाथ देवकुळे, संजय देशमुख, सचिन गायकवाड, शहाजहान शिकलगार, सुवर्णा ढवळे, सचिन धाकतोडे, समाधान घाटशिळे, दिगंबर गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.