धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्याच्या वतीने सन 2024-25 मध्ये गाळप केलेल्या ऊस बिलाची रक्कम 100 रूपयांप्रमाणे शेतकयांच्या बँक खात्यावर जमा केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा मांजरा शुगर इंडस्ट्रीजचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखाना यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. गाळप हंगाम 2024- 25 मध्ये कारखान्याचे 2 लाख 50 हजार 537 मे. टन ऊसाचे गाळप करुन 2 लाख 80 हजार 855 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा 11.21 टक्के प्राप्त झाला आहे. कारखान्याने गाळप हंगाम 2024-25 मध्ये गाळपास आलेल्या ऊसासाठी यापूर्वी प्रति मे. टन 2700 रूपये दर अदा केलेला आहे. तसेच यापुढे जावून कारखाना व्यवस्थापनाने सदर हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रति मे. टन 100 रूपयांप्रमाणे वाढीव ऊस दर देण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव ऊस बिलाची रक्कम 17 एप्रिल रोजी संबंधीत ऊस पुरवठादार शेतकरी यांचे बँक खातेवर जमा केल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी दिली आहे.
गतवर्षी या भागामध्ये अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कारखान्याला ऊसाअभावी आपला गाळप हंगाम आटोपता घ्यावा लागला. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्येही कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी वाढीव ऊस दर प्रति मे. टन 100 रूपयांप्रमाणे भाव देण्याचे कारखाना प्रशासनाला आदेश दिले. त्यामुळे कारखाना प्रशासनाने सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून 75 व्या वाढदिवसानिमित्त 17 एप्रिल रोजी गाळप हंगाम 2024-25 मध्ये गाळपास आलेल्या ऊसाला वाढीव भाव प्रति मे. टन 100 रूपये प्रमाणे ऊस बिलाचे पेमेंट संबंधीत ऊस पुरवठादार शेतकयांच्या बँक खात्यात वर्ग केले आहे. यामधुन सहकार महर्षी मा. दिलीपराव देशमुख यांचा या भागातील शेतकयांप्रती असलेला जिव्हाळा दिसून येतो. शेतकयांच्या जिवनामध्ये आर्थिक क्रांती आणून त्यांचे जिवनमान समृध्द करण्याचा एकमेव हेतू यातून दिसून येतो.
गाळप हंगाम 2024- 25 मध्येही कारखान्याने एफआरपी पेक्षा वाढीव ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे गाळप हंगाम 2024-25 मध्ये शेतकयांना प्रति मे. टन 2800 रूपये प्रमाणे ऊस दर मिळाल्यामुळे ऊस
पुरवठादार शेतकयांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. मागील पाऊस हंगामामध्ये सरासरीपेक्षा जादाचा पाऊस झाल्याने या भागातील शेतकयांनी आपल्या ऊसाची नोंद कारखाना गट कार्यालयात केलेली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात कारखान्याकडे झालेल्या ऊस नोंदीचे येणाया गाळप हंगाम 2025 - 26 मध्ये गाळप करण्याचे नियोजन कारखाना प्रशासनामार्फत केलेले आहे. त्यामुळे या भागातील संपूर्ण ऊस पुरवठादार शेतकयांनी मांजरा शुगर इंडस्ट्रीज (कंचेश्वर) कारखान्याकडे आपल्या ऊसाचा पुरवठा करुन सहकार्य करण्याचे आवाहन कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे यांनी केले आहे.