तुळजापूर (प्रतिनिधी)-   शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आक्रमक पणे आवाज उठविणारी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सह कार्यकर्ते अचानक शांत झाल्याने  शेतकरी  वर्गात काहीसी पोरके पणाची भावना निर्माण झाली आहे.

 धाराशिव जिल्हयात अनेक शेतकरी संघटना आहेत.माञ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आवाज उठविणारी ऐकमेव्य संघटना ही स्वाभीमानी शेतकरी संघटना होती स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे विविध आंदोलने हे लक्षवेधी ठरत. कधी रस्त्यावर उतरुन तर कधी गनिमी कावा पध्दतीने आंदोलने स्वाभीमानी शेतकरी संघटनेने करुन जिल्हयात शेतकऱ्यांसाठी लढणारी संघटना म्हणून आपली इमेज तयार केली होती. शेतकरी कर्जमाफी विजबिल सोयाबीन ऊस सह अनेक पिकांना भाववाढ मिळावी म्हणून ही संघटना सतत लढत होती. या संघटनेचे आंदोलने ही कुठल्याही अर्थिक पाठबळ विना कमी खर्चात सर्वासामान्य  शेतकरी सहभागाने यशस्वी झाले .धाराशिव जिल्हयातील स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे आंदोलने राज्यात लक्षवेधी ठरत होते.  स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा राजु शेट्टी  यांची सतत बदलणाऱ्या  राजकिय भूमिके  मुळे  तसेच राजु शेट्टी यांनी येथील  संघटनेचे पदाधिकारीना  वा-यावर सोडुन दुसऱ्या च मंडळी साठी आपला शब्द टाकण्याच्या घटना  पदाधिकारी कार्यकते  यांना  कळताच ही मंडळी  नाराज होत गेल्यानेच येथील पदाधिकारी व कार्यकत्यांचा आक्रमक पणात शिथलता आल्याचे बोलले जाते  परिणाम शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक पणे आंदोलन करणारे येथील पदाधिकारी शांत झाले याचा परिणाम जिल्हयातील शेतकऱ्यांच्या प्रश्न माञ जैसे थे राहिले. काही मंडळी  शेतकरी संघटनेच्या नावाने आपली अर्थिक पोळी भाजुन घेऊ लागले फक्त अर्थीक ठिकाणी च आंदोलन होवु लागले.                 


पवनचक्की माध्यमातून दलाल मालामाल शेतकरी कंगाल !                        

सध्या पवनचक्की कंपनी व त्यांच्या  ठेकेदार यांच्या कडुन जिल्हयात शेतकऱ्यांची  शेती माध्यमातून अर्थीक लुट होवु लागली. यात शेतकऱ्यांच्या बाजूने निस्वार्थी पणे कुणी ही लढले गेले नाही परिणामी याचा शेतकऱ्यांना कमी भावात आपल्या जमिनी दलालांना द्याव्या लागल्या. दलाल मालामाल झाला शेतकरी माञ कंगाल झाला. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकारी कार्यकत्यांची शिथलता पवनचक्की कंपनी वाले तसेच दलाल मंडळीच्या पय्थावर पडली.त्या मुळे सर्वसामान्य  शेतकरी वर्गावर अन्याय वाढला.

 
Top