तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर - लातूर रोड तडवळा बायपास येथे रेल्वेसाठी संपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर जलसंधारण बंधारा बांधण्याचा प्रकार सुरु आहे.हा प्रकार म्हणजे जागा एक योजना दोन असा असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे बाधीत शेतात बंधाऱ्याची गरज नसताना त्याठीकाणी बंधारा बांधणे जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांचा अट्टाहास का असा सवाल विचारला जात आहे त्यामुळे जलसंधारण विभागाचा बंधा-यांसह सर्वच कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
पावसाचे वाहणारे पाणी अडवून जमिनीत जिरावे, भूगर्भातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, उन्हाळ्यात पाणीसाठ्याचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, या उद्देशाने मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने बंधाऱ्याचे काम हाती घेतले जात आहे. मात्र, या ठिकाणी या योजनेत प्रचंड प्रमाणात गैरप्रकार होताना दिसून येत आहे. संगनमत करून गुत्तेदाराच्या व आधिकाराच्या आर्थिक फायद्यासाठी केंद्र शासनाच्या भुसंपादन झालेल्या जमिनीत पुन्हा बंधारा बांधण्याचा घाट.ओढ्याच्या ठिकाणी काँक्रिटचा बंधारा बांधून शासनाची लाखो रुपयाची लूट शासनाने नियोजन शुन्य नियोजनाअभावी बांधण्यात येत आसलेला हा बंधारा बांधण्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हा बंधारा बांधण्याची जागा चुकली असली तरी गुत्तेदार व संबंधित अधिकाऱ्याचा घाट मात्र कायम आहे.