कळंब (प्रतिनिधी) - तालुक्यात आज पासून प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वार्षिक परीक्षेला प्रारंभ झाला आहे या वार्षिक परीक्षेला पहिल्याच घासाला खडा लागल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागेल . शाळा व गटशिक्षण अधिकारी कार्यालय यांच्यात समन्वय नसल्यामुळे हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा हाकणात त्रास सहन करावा लागला आहे सकाळी आठला सुरू होणारा पेपर चक्क दहा वाजता सुरू झाल्याने  मोठी खळबळ उडाली आहे .

यात शिक्षकांची अवस्था मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट असे असल्यामुळे काहीसा प्रकार अलबेल असल्याचे बोलले जात आहे .  शिक्षण अधिकारी कार्यालयाने कळंब तालुक्यातील सर्व शाळांना प्रश्नपत्रिका या पेपर सुरू होण्यापूर्वी काही काळ अगोदर दिल्या जातात त्या प्रत्येक शाळेने प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनुसार मोजून घेतल्या पाहिजेत असा शासनाचा नियम आहे पण शासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे शाळा चालतात का हाच प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे शिक्षणाधिकारी कार्यालयाने प्रश्नपत्रिका मोजू दिल्या नाहीत त्यामुळे हा प्रकार घडला असं शाळेचं म्हणणं आहे पण शिक्षणाधिकारी कार्यालयाने हा दावा चक्क फेटाळून लावल्यामुळे शाळा तोंडघशी पडलेल्या आहेत .

आज दि . ८ आठ रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे , ३०  स्टार प्रकल्प अंतर्गत मूल्यमापन ०२  २४- २५  प्रथम भाषा मराठी या विषयाचा  पेपर होता . या प्रश्नपत्रिका गटशिक्षण अधिकारी कार्यालयातून प्रत्येक शाळेला प्राप्त होतात . शाळा आपला प्रतिनिधी पाठवून गटशिक्षण अधिकारी कार्यालयातून विद्यार्थी व प्रश्नपत्रिका यांचा ताळमेळ लावून हे वाटप केले जाते परंतु गटशिक्षण अधिकारी कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे व शाळा व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे हा गोंधळ उडाल्याने कळंब तालुक्यातील व शहरातील बहुतांश शाळांमध्ये आज आठ चा पेपर चक्क  दहा वाजता सुरू झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे .  याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी असा प्रकार घडलाच नाही असा दावा केले आहे . हा प्रकार शिक्षण अधिकारी यांनी तातडीने मनावर घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी  दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शिक्षकाकडून जोर धरत आहे .


आमच्याकडे प्रश्नपत्रिका भरपूर आहेत प्रत्येक शाळेने त्या कलेक्ट केल्या आहेत त्यामुळे असा प्रकार घडणे शक्य नाही आणि जर घडला असेल तर त्याबाबत आमच्याकडे कुणाचीही अद्याप तक्रार प्राप्त झाली नाही त्यामुळे कधी परीक्षा सुरू झाली आणि कधी संपली हे आम्हाला अद्यापही माहित नाही . गटशिक्षणाधिकारी- धर्मराज काळमाते .


आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या व प्रश्नपत्रिका यांच्या तफावत होती आम्हाला गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून १०० प्रश्नपत्रिका आहेत असे सांगून एक एक गठ्ठा घेण्यास भाग पाडले त्यावेळेस आम्हाला त्या प्रश्नपत्रिका मोजून दिल्या नाहीत त्यामुळे आम्हाला प्रश्नपत्रिका कमी आल्या विद्यार्थ्यांची संख्या व प्रश्नपत्रिका यांच्यात आमच्या ताळमेळ लागला नाही नंतर आम्ही गटशिक्षणाधिकारी कार्यालयास प्रकार कळून पुन्हा प्रश्नपत्रिका हस्तगत केल्या त्यामुळे पेपरला उशीर झाला .

मुख्याध्यापक -  काकासाहेब मुंडे .

सावित्रीबाई फुले विद्यालय कळंब

 
Top